🌟अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे🌟
पुणे :- राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बारावी बोर्डाचा निकाल पुढील महिन्यात १३ तारखेला लागणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर १५-१६ तारखेला दहावीचा निकाल अपेक्षित असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही इयत्तांचा निकाल केव्हा लागणार? हे जवळपास स्पष्ट झाले आहे. सध्या गुणांची अंतिम पडताळणीचे काम सुरू आहे. त्यानंतर १३ मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल. त्याची अधिकृत घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री करतील, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या