🌟यावेळी बारावी विज्ञान शाखा व कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला🌟
तसेच इयत्ता 12वी कला शाखेचा एकूण निकाल 98.24% लागला असून यामध्ये एकुण 57 विद्यार्थ्यांपैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्य धारक विद्यार्थी 04, प्रथम श्रेणी 43, द्वितीय श्रेणी मध्ये 09, विद्यार्थी पास झाले.यामध्ये प्रथम क्रमांक काजल माणिक कांबळे 75.67% व आरती गुलाब कांबळे 75.67%, द्वितीय क्रमांक दिपाली भिमराव मोरे 75.33%, तृतीय क्रमांक शितल भगवानराव देशमुख 74.83%, चतुर्थ क्रमांक रोहन नारायण झुंगरे 73.33% यांनी विद्यालयांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, व चतुर्थ क्रमांक पटकाविला तसेच पाली या विषयांमध्ये अकरा विद्यार्थी 100 पैकी 100 गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. तसेच यावेळी पालक लेकुळे यांनी आपल्या भाषणामधून शाळेचे व संस्थेचे कौतुक केले व पालकांना व विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचे अवाहन केले. पी.आय.श्री अशोकराव घारगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा पर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्यास सांगितले तसेच मोबाईलचा वापर शालेय कामासाठीच करावा असे सांगितले. तसेच बेंगाळ साहेबांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणात संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बी.सी.ए., बी-डिझाईन,डी-फार्मसी, बी- फार्मसी,ए.एन.एम. व जि.एन.एम. नर्सिंग कॉलेज, डीएड व ऑप्टोमेट्री डोळा तपासणीचा कोर्स या कोर्सेसची व्यवस्था केलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी वरील कोर्सेस ला प्रवेश घ्यावा असे सांगितले. तसेच वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब, उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ, सचिव श्री अंकुशराव रामराव बेंगाळ, विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भास्करराव बेंगाळ, मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी, मुख्याध्यापक श्री सरकटे सर, पर्यवेक्षक श्री कसाब सर, परीक्षा विभाग प्रमुख श्री चोपडे जी एस, व संस्थेमधील प्रा. माटे सर, प्रा.मेश्राम सर, प्रा. अंकिता बेंगाळ प्रा. तोंडे सर तसेच सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.....
0 टिप्पण्या