🌟अशी माहिती राज्य सचिवालयातील सूत्रांनी दिली🌟
मुंबई :- राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफ करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे अशी माहिती राज्य सचिवालयातील सूत्रांनी दिली.
राज्यात ईव्हींचा हिस्सा २५% पर्यंत नेण्यासाठी ही महत्त्वाची पावले उचलली जात असून, ही नवीन ईव्ही धोरणातील एक महत्त्वाची तरतूद आहे. परिवहन विभागाने मांडलेला हा प्रस्ताव आर्थिक व इतर विभागांकडून मंजुरीनंतर मंत्रिमंडळात मंजूर होण्याची शक्यता असून, १ मे २०२५ पासून ही योजना लागू होऊ शकते.....
0 टिप्पण्या