🌟मुघल काळाच्या खुणा मिटवण्यासाठी आणि या ठिकाणांची मूळ नावे पुन्हा बहाल करण्याचे आवाहन🌟
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल शनिवार दि.२६ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही शहरांसह गावांची देखील नावे बदलण्याची मागणी केली आहे अतिरेकी घुसखोर मुघल काळाच्या खुणा मिटवण्यासाठी आणि या ठिकाणांची मूळ नावे पुन्हा बहाल करण्याचे आवाहन पडळकर यांनी केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी सांगितले की ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून खानापूर शहराचे नाव भवानीपूर असे बदलण्याची विनंती करणार आहेत त्याचप्रमाणे जत तालुक्यातील सुलतान गडे गाव आणि उमदी गावांची नावेही बदलली पाहिजेत. जिथे जिथे मुघल काळाच्या खुणा आहेत, तेथे त्या नावांचा पुसटसाही ठसा राहू नये आणि जुनी नावे पुनर्स्थापित करण्यात यावी, असे सांगलीच्या जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पडळकर यांनी सांगितले.
पडळकर यांनी 'सर्व धर्म समभाव' या संकल्पनेवरही टीका केली. 'सर्व धर्म समभाव' ही संकल्पना हिंदूंना एक प्रकारची नशेची गोळी म्हणून दिली गेली आहे. हिंदूंनी यातून बाहेर पडायला हवे. फक्त हिंदूंनाच याचे पालन करण्याची अपेक्षा का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.....
0 टिप्पण्या