🌟जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत वेगवान हालचाली....!

 


🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरु ; मोदींचा नियोजीत रशिया दौरा रद्द🌟

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीत वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज देशाच्या सुरक्षे संदर्भात महत्वपूर्ण चार बैठका पार पडल्या. त्यातच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल करण्यात आले आहेत. सेवानिवृत्त रॉ प्रमुख अलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारच्यावतीने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले टाकली जात जात आहेत. भारताच्या कठोर भूमीकेमुळे पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केले आहेत. सेवानिवृत्त रॉ प्रमुख आलोक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांचे केंद्रीय सुरक्षा बोर्ड तयार करण्यात आले आहे. या बोर्डामध्ये तिन्ही सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पीएम सिन्हा, माजी दक्षिणी आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. हे देखील मंडळाचा भाग असतील. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलिस सेवेतून निवृत्त झाले आहेत. बी व्यंकटेश वर्मा हे सात सदस्यांच्या मंडळावर निवृत्त परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ हा एक खास सल्लागार गट आहे ज्यामध्ये शासकीय यंत्रणेबाहेरील नामवंत व्यक्तींचा समावेश असतो. या मंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या उपयोगासाठी दीर्घकालीन विश्लेषण करणे. परिषदेमार्फत मांडण्यात येणाऱ्या मुद्यांवर हे मंडळ उपाययोजना आणि धोरणात्मक पर्याय सुचवते. बुधवारी पंतप्रधान मोदींनी चार प्रमुख बैठकांमध्ये भाग घेतला. त्यांनी सीसीएस, सीसीपीए, सीसीईए आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षपद भूषवले. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ची बैठक घेण्यात आली. याच वेळी आणखी दोन समित्यांच्याराजकीय घडामोडींसाठी कॅबिनेट कमिटी आणि आर्थिक घडामोडींवरील कॅबिनेट कमिटी बैठकाही पार पडल्या. या सर्व बैठकांचे आयोजन पंतप्रधान निवासस्थानीच करण्यात आले. यामुळे पाकिस्तान घाबरला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या