🌟महाराष्ट्र राज्यातील तमाशा व कला केंद्र कलावंतांच्या तक्रारींचे करणार निवारण....!


🌟सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा :  तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समिती स्थापन🌟


मुंबई: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील तमाशासह कला केंद्रांतील लोक कलावंतांच्या विविध तक्रारीचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी म्हटले आहे या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फडमालक, कलाकार वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील, अशी माहिती मंत्री शेलार यांनी दिली.

तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष असणार असून, तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, तमाशा फड मालक गोपाळ नाना शेषेराव, फड मालक संभाजी जाधव, कलाकार मंगला बनसोडे, कलाकार अतांबर तात्या शिरढोणकर, अभ्यासक गणेश चंदनशिवे, अभ्यासक खंडुराज गायकवाड व सहसंचालक हे सदस्य म्हणून काम पाहतील.

कलाकेंद्र तक्रार निवारण समितीमध्ये संचालक सांस्कृतिक कार्य हे अध्यक्ष असणार असून, कलाकेंद्र मालक बाळासाहेब काळे, कलाकेंद्र मालक अभिजित काळे, कलाकार रेश्मा परितेकर, कलाकार सुरेखा पुणेकर, कलाकार प्रमिला लोदगेकर, कलाकार संघटनेचे धोंडीराम जावळे, अभ्यासक प्रकाश खांडगे व सहसंचालक हे सदस्य माणून काम पाहतील.

💫समित्यांचा कार्यकाळ ३० दिवसांचा : समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाणार :-

समित्यांचा कार्यकाळ ३० दिवसांचा असून, आवश्यकतेनुसार या क्षेत्रातील इतर अभ्यासक, कलाकार आणि कला केंद्र चालक यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या