🌟पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा काल मंगळवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू🌟
मुंबई :- जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम जवळ असलेल्या बैसरन येथे राक्षसी प्रवृत्तीच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात महाराष्ट्र राज्यातील सहा पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले राक्षसी प्रवृत्तीच्या धर्मांध दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष गोळीबारात जखमी असलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा काल मंगळवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे उशिरा जाहीर करण्यात आले.
मिनि स्विर्झलँड समजल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळ असलेल्या बैरसन या पर्यटनस्थळी मंगळवारी दुपारी पोलीसी वेशात असलेल्या दहशतवाद्यांनी अमानवीय पध्दतीने देशभरातील २८ पर्यटकांचा बळी घेतला. या २८ मध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा देखील मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, तर पनवेल मधील दिलीप देसले, पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेच्छुट गोळीबार केला होता यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर श्रीनगर मधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान रात्री उशिरा या दोघांची प्राणज्योत मालवली. या हल्ल्यात एस. बालचंद्र, सुबोध पाटील, शोबीत पटेल हे तीघे जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मयत व पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणणार या हल्ल्यात मयत झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी राज्य शासनाने विशेष विमानाची सोय केली आहे. ठाणे आणि पनवेल मधील मयत झालेले पर्यटक दिलीप देसले, संजय लेले यांचा पार्थिव देह घेवून श्रीनगरहून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे रवाना झाले आहे. तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा पार्थिव देह सायंकाळी ६ वाजता विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे. हेमंत जोशी, अतुल मोने यांचा पार्थिव देह आज दुपारी श्रीनगरहून मुंबईत विमानाने आणण्यात आला. मुंबई विमानतळावर मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे समन्वयासाठी उपस्थित होते असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याचसोबत काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना विमानाने आणण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन स्वतः काश्मीरकडे रवाना झाले आहेत. या भागात अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.......
0 टिप्पण्या