🌟पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करण्यासाठी पाच मोठे निर्णय🌟
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममध्ये धर्मांध राक्षसी प्रवृत्तीच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या अमानुष हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करण्यासाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
भारताने कडक पावले उचलत बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने हल्लेखोरांना पाकिस्तानच्या असलेल्या थेट पाठिंब्यावरून प्रहार केला. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर थेट आरोप केला असून पाकिस्तानी दूतावास बंद करण्यास सांगितले आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद आयोग बंद करण्यात आला असून अधिकाऱ्यांना 5 पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश दिले आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मित्री म्हणाले की, सीसीएस निर्णयात सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्कअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारी व्हिसा सूट रद्द करण्यात आली आहे आणि र त्याअंतर्गत, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारतातील सर्व पाकिस्तानी लष्करी सल्लागारांनाही एका र आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले 1 आहे. भारताने इस्लामाबादमधून सल्लागारांनाही परत न बोलावले आहे. उच्चायुक्तालयांची एकूण संख्या ३० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियावरून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावरच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सुरक्षा समितीची बैठक घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तिन्ही लष्करी दलांचे प्रमुख, - संरक्षण सचिव आणि लष्करी संचालनालय प्रमुख यांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच लष्कराला युद्धाच्या तयारीत राहण्याचे आणि दहशतवादविरोधी ड कारवायांची मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले.
कानपूरचे व्यापारी शुभम द्विवेदी, ज्यांनी फेब्रुवारीत विवाह केला होता, त्यांना दहशतवाद्यांनी कुराणातील आयत न वाचण्यास सांगितलं. ते न वाचल्याने डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. कोचीतील रामचंद्रन हे त्यांच्या मुलीसमोर गोळ्यांनी ठार मारले गेले. ते पत्नी, मुलगी आणि नातवंडांसह सुट्टीसाठी गेले होते पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी जनतेची माफी मागितली आणि घटनेबद्दल लज्जित असल्याचे सांगितले. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने देखील लाल चौकात मोर्चा 7 काढून निषेध केला रामबन जिल्ह्यात हिंदू आणि मुस्लिम दोघांनी मिळून बंद आणि शांततापूर्ण निषेध केला. "हे इस्लामच्या शिकवणुकीच्या विरोधात आहे," असे बवळी बाजार येथील जामा मशिदीचे इमाम गुल मोहम्मद फारुकी यांनी सांगितले
💫तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील गुप्तचर विभागातील अधिकारी मनीष रंजन यांची धर्मांध राक्षसांनी केली हत्या :-
हैदराबादमध्ये गुप्तचर विभागात काम करणारे मनीष रंजन यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे मनीष रंजन हे मूळचे बिहारचे होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते जम्मू आणि काश्मीरला फिरायला गेले होते.
💫पुण्यातील व्यावसायिकावर कुराणातील कलमा म्हणता न आल्याने धर्मांध राक्षसांनी केला गोळीबार :-
पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, कलमा म्हणता न आल्याने पुण्यातील व्यावसायिक संतोष जगदाळे यांच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांची मुलगी आसावरी म्हणाली की, "वैसरन व्हॅलीमध्ये असताना आम्हाला गोळीबाराचा आवाज आला, म्हणून आम्ही कॅम्पमध्ये जाऊन लपलो. तिथे आधीच ७-८ जण होते. गोळीबारापासून वाचण्यासाठी आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो. त्यानंतर काही वेळाने एक दहशतवादी आमच्या तंबूत शिरला आणि माझ्या वडिलांना बाहेर येण्यास सांगितले. त्यांना कलमा म्हणण्यास सांगितले. ते म्हणता न आल्याने माझ्यादेखत वडिलांना डोक्यात, कानामागे आणि पाठीमागे तीन गोळ्या झाडण्यात आल्या. माझे काका माझ्या शेजारी होते. दहशतवाद्यांनी त्यांनाही चार ते पाच गोळ्या झाडल्या."
💫नवी मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील ४०,भंडाऱ्यातील ४८ पर्यटक अडकले :-
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ४० पर्यटक अडकले आहेत. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून इतर ३७ पर्यटक सुरक्षित आहेत. भंडारा जिल्ह्यातील ४८ पर्यटकही तिथे उपस्थित होते. ते सर्व सुरक्षित असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला आहे. बुलढाण्यातील ५ जण या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. अतिरेक्यांनी हल्ला केला, तेव्हा हे कुटुंब तेथीलच एका हॉटेलमध्ये थांबले होते. ते मंगळवारी दुपारी पर्यटनासाठी हॉटेलबाहेर पडणार होते, पण हॉटेल मालकाने त्यांना रोखल्याने त्यांचा जीव बचावला. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील जम्मू काश्मीरच्या सहलीला गेलेले ६७ पर्यटक पुलगावमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
💫अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचा जयपूर सिटी पॅलेस दौरा रद्द :-
भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स बुधवारी जयपूरच्या सिटी पॅलेसला भेट देणार होते, परंतु हा दौरा रद्द करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. बुधवारी सकाळी व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आग्रा येथील ताजमहाल पाहिला. आग्र्यात सुमारे ३ तास घालवल्यानंतर ते जयपूरला परतले. सध्या व्हान्स आणि त्यांचे कुटुंबीय रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये आहेत. ते गुरुवारी सकाळी ६:३० वाजता अमेरिकेला रवाना होतील
💫शिवसेना राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरला रवाना :-
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. शिंदे हे रात्री ८ वाजता श्रीनगर विमानतळावर पोहोचले. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर रात्री ते सर्व पर्यटकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पर्यटकांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या