🌟पाकिस्तान पिपल्स पार्टीचा प्रमुख माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारीचा विषारी फुत्कार🌟
भारताने सिंधू जलकरार रद्द करताच पाकिस्तान पिंपल्स पार्टीचा प्रमुख तथा माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारीने विषारी फुत्कार सोडले असून त्याने राक्षसी प्रवृत्तीचा प्रत्यय देत भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यास चक्क सिंधू नदीतून एक तर पाणी वाहिले नसता रक्ताचे पाट वाहतील अशी चिथावणी दिली आहे त्याच्या सोबतच पाकिस्तानचा माजी पंतप्रधान शहबाज शरीफ यानी सुध्दा सिंधू करार रद्द झाल्याबद्दल जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम मधील बैसरन येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेच्छुट गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटक मृत्यूमुखी पडले. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर पाच निर्बंध घातले. ४८ तासात भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा. त्याचसोबत स्वातंत्र्यानंतर कधीही मोडीत न निघालेला सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. या करारानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युध्दही झाली. अनेकवेळा तणावाच्या परिस्थितीत देखील भारताने सिंधू पाणी वाटप करार चालूच ठेवला होता. बैसरन हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुध्द कठोर पावले उचलावयास सुरुवात केली आहे. हा करार रद्द झाल्याने पाकिस्तानमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानमधील २५ टक्के शेती अवलंबीत आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी सिंधू नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यास पाकिस्तानमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. या विषयी पाकिस्तान पिपल्स पार्टीचे प्रमुख आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी एका सभेत भाषण करतांना सिंधू नदी आमची आहे. या नदीतून आमचं पाहिल वाहिल नाहीतर त्यातून आमच्याच रक्ताचे पाट वाहतील असा इशारा दिला आहे......
0 टिप्पण्या