🌟परभणी जिल्ह्यातील सेलू डिग्रस रस्त्याच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : चक्क रस्त्यावरील गिट्टी पडली उघडी.....!


🌟पावसाळ्याला अवघा एकच महिनाच बाकी असतांना अद्डांयापही बरीकरण नाही🌟

सेलू (प्रतिनिधी - दि.19 एप्रिल) - प्रशासनाने दुर्लक्ष केलेला तालुक्यातील सेलू ते डिग्रस जहांगीर हा रस्ता केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा व कंत्राटदाराच्या वेळकाढूपणा यामुळे अत्यंत धीम्या गतीने काम सुरू आहे.याचा त्रास मात्र सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना होत असतांनाही प्रशासनातील अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासकीय मान्यता होऊन साडेचार कोटींचा निधी सेलू ते डिग्रस जहांगीर या रस्त्याला मंजूर झाला.संभाजीनगर येथील कंत्राटदाराला हे काम मिळाले आहे.तेव्हापासून या रस्त्याच्या कामाला केवळ चालढकल केली जात आहे.शेवटी दरवेळी या भागातील नागरिक स्वतः अधिकाऱ्यांना फोन करतात अडचणी सांगतात.नागरिकांनी फोन केल्यावर मग अधिकारी सूत्र हलवतात व रस्त्याचे काम सूरी होते.पुन्हा काही दिवसात रस्त्याचे काम बंद पडते.सध्या या रस्त्यावर केवळ गिट्टी टाकून त्यावर मुरूम टाकून दबई केली आहे.परंतु पुन्हा रस्त्याचे काम बंद पडले आहे.यामुळे या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे.यामुळे बैलगाडी,वाहने,मोटारसायकल असे कोणतेच वाहन चालवता येत नाही.सुरुवातीपासून मुरूम व गिट्टीचे कामही संथ गतीने केले आहे.यामुळे वाहनधारकांना त्रास तट होतच आहे परंतु अनेकवेळा वाहने बाजूला जाऊन अपघातही होत आहेत.संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंता स्वतः दोन ते तीन वेळा या रस्त्याला भेट देऊन गेले तरीही कंत्राटदार रस्त्याच्या कामाला गती देत नाहीत.आता पावसाळा महिनाभरार आलेला असतांना अजून डांबरीकरणचा एक थर सुद्धा झालेला नाही.जर पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण न झाल्यास शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा आणखी त्रास होणार आहे.शेतात जाणेच अवघड होऊन बसणार आहे.विशेष म्हणजे कंत्राटदार कामाला उशीर करत असताना अधिकारी मात्र काही कारवाई करतांना दिसत नाहीत.या रस्त्यावरील अभियंता हे घेऊन भेट देऊन जातात पण बहुतेक तेही गुत्तेदारापुढे बोलू शकत नाहीत की काय? असा प्रश्न जनतेला पडत आहे.या भागातील शेतकरी अक्षरश चिडून तर कधी विनंतीने वारंवार फोनवर अधिकाऱ्यांना संपर्क करतात कारण शेतकऱ्यांनाच गरज आहे.प्रशासन मात्र कोणत्या मानसिकतेत आहे हेच कळायला मार्ग नाही.यामुळे तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू करावे व ते गुणवत्तापूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

💫महिनाभरात होणारे डांबरीकरण टिकेल काय ? 

संबंधित गुत्तेदाराने सदरील रस्त्याचे डांबरीकरण आधीच सुरू करणे गरजेचे होते.एकूण 3 थर डांबरीकरणचे व्हायला पाहिजे व एक व दुसऱ्या  थरात काही दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे.परंतु आता पावसाळा एक महिन्यांवर येऊन ठेपला आहे.एकाच महिन्यात पूर्ण डांबरीकरण कसे होणार? कोणते प्रगत तंत्रज्ञान वापरणार हाही प्रश्न आहे.केवळ थातुरमातुर काम न करता गुणवत्तापूर्ण काम होणे आवश्यक आहे.यासाठी अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या