🌟असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी के.व्ही.तिडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟
परभणी :- महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे,वसतिगृहे,अनाथाश्रम चालविले जात असल्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत यात सदर संस्थेत बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्याबाबत निदर्शनास येत आहे. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील कलम ४२ नुसार मान्यता तथा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला ०१ वर्ष कारावास तसेच रुपये ०१ लक्ष पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतूद नमूद करण्यात आलेले आहे.
आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ या वर संपर्क साधुन बालकांवरील शारिरीक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी के.व्ही.तिडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....
0 टिप्पण्या