🌟भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी सन्माननीय न्यायाधीश भूषण गवई घेणार शपथ.....!

 


🌟राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देती🌟

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील अमरावती येथील भुमि पुत्र सन्माननीय न्यायाधीश भुषण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून दि.१४ मे २०२५ रोजी शपथ घेणार आहेत न्यायाधीश भुषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते तथा सिक्कीम व केरळ राज्यांचे माजी राज्यपाल रा.सु.गवई व कमलाताई गवई यांचे सुपुत्र आहेत भारताचे विद्यमान सन्माननीय सरन्यायाधीश संजीव खन्ना हे येत्या १३ मे २०२५ रोजी निवृत्त होत असून त्यानंतर न्यायाधीश भूषण गवई हे भारताचे नुतन सरन्यायाधीश होणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.

सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तीमध्ये भूषण गवई ज्येष्ठ असून पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. याआधी न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते अमरावतीत जन्मलेल्या भूषण गवई यांनी नागपूर विद्यापीठात कला शाखेतून पदवी घेतली. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. नागपूर बार असोसिएशनमध्ये न्यायमूर्ती गवई १९८५ मध्ये सहभागी झाले. त्यानंतर १९८७ ते १९९० या कालावधीत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली होती.

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर, औरंगाबाद, पणजी खंडपीठात न्यायमूर्ती म्हणूनही भूषण गवई यांनी काम केले आहे. २००३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले होते. त्यानंतर २००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शिफारस केली गेली. त्यानंतर आता त्यांची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. भूषण गवई हे २३ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या