🌟महाराष्ट्र राज्यातून १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता ? पोलिसांकडून शोध सुरू.....!

 


🌟पाकिस्तानी नागरिकांना जे आश्रय देतील, त्यांनाही सोडणार नाही : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश🌟

मुंबई : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर राक्षसी प्रवृत्तीच्या धर्मांध दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी काल रविवार दि.२७ एप्रिल २०२५ हा शेवटचा दिवस होता दरम्यान महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी १०७ पाकिस्तानी बेपत्ता असून ते कुठे लपले असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील आणि तिथेच ठोकतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही, रविवारी रात्री किंवा सोमवारपर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. "पाकिस्तानी नागरिकांना जे आश्रय देतील, त्यांनाही सोडणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. काश्मीरमध्ये झालेला हल्ला दुर्दैवी होता. तिथे जाणे हे माझे कर्तव्य होते. त्यावरूनही राजकारण केले जात आहे," असे शिंदे म्हणाले.

बेपत्ता पाकिस्तानी नागरिकांबाबत फडणवीस म्हणाले की, "गृहमंत्री म्हणून सांगतो की, यावर काहीही बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सगळे सापडलेत. सगळे देशाबाहेर चाललेत. त्यांना बाहेर घालवण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारपर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या