🌟केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने रेल्वेच्या ४ मोठ्या प्रकल्पांना दिली मंजुरी...!

 


🚉महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारने केली ४,८१९ कोटींची तरतूद🚉

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने काल शुक्रवार दि.०४ एप्रिल २०२५ रोजी रेल्वेच्या एकूण १८,६५८ कोटी रुपयांच्या ४ मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली ज्यात महाराष्ट्र, ओडिसा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील १५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे १,२४७ किमीने वाढणार आहे. वात्त महाराष्ट्रातील ४,८१९ कोटी रपदांच्या गोंदिया-बल्लारशहा मार्गावरील २४० किमी लांबीच्या लाइन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. छत्तीसगडमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने ६१५ किमी लांबीचा नतीन रेल्वे मार्ग उभारण्यासाठी ८,७४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या मार्गावरील रस्ते वाहतुकीच्या तुलनेत या नवीन रेल्वे मार्गामुळे लॉजिस्टिक खचांत २,५२० कोटी रुपयांची बचत होईल. हा देशातील सचीत मोठ्या रेल्वे प्रकल्पांपैकी एक असेल, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले ओरिसात ३.९१७ कोटी रुपये खचांचा २७७ किमी लांबीच्या प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे संबलपुर आणि जरापाडा दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग जोडला जाणार आहे, तर चौथा प्रकल्प ओदिशातील असून, येथील झारसुगुडा-ससोन दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग ओडला जाईल.....

🚉महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा गोंदिया-बल्लारशहा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प :-

गोंदिया-बल्लारशहा हा महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २४० किमी लांबीचा हा प्रकल्प असून यासाठी ४,८१९ कोटी रुपये खर्च येईल. यामुळे या भागात रेल्वेची क्षमता वाढेल आणि पर्यटनाला आणखी चालना मिळेल. तसेच या प्रदेशातील अर्थव्यवस्थेलादेखील चालना मिळेल. या प्रकल्पामुळे भारतातील उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांतील प्रवासी आणि मालवाहतूक आणखी वाढण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या