🌟देशात जातनिहाय जनगणना करण्यास केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने दिली मंजुरी....!

 


🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय🌟

नवी दिल्ली : देशात जातनिहाय जनगणना करण्यास केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.३० एप्रिल २०२५ रोजी राजकीय व्यवहारा बाबत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेससह भारतीय कम्युनिस्ट पक्ष व इतर विरोधी पक्षांनी जातीय जनगणनेची मागणी केली होती. परंतु केंद्र सरकारने ती फेटाळली होती. देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. २०२१ साली जनगणना होणे अपेक्षित होते परंतु या कालखंडात कोरोना संसर्ग असल्यामुळे जनगणना होवू शकली नाही. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत लवकरच जातीय जनगणना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेससह डाव्या पक्षांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची पत्रकारांना माहिती देतांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, काँग्रेसने जातीय जनगणनेसंदर्भात केवळ सर्व्हेक्षण करुन घेतले होते अशी टीका त्यांनी यावेळी केली. १९४७ नंतर जातनिहाय जनगणना करण्यात आली नव्हती. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कार्यकाळात काही राज्यांनी राजकीय दृष्टीकोणातून जातनिहाय सर्व्हेक्षण केले होते. असे ते म्हणाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या