🌟पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने चोख प्रत्युत्तर
चकमकीत ५ पाकिस्तानी घुसखोर ठार🌟
जम्मू : भारताशी कायमचे शत्रूत्व पुकारलेल्या दुष्ट पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये मंगळवार दि.०१ एप्रिल २०२५ रोजी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला यावेळी भूसुरुंगाचा स्फोट झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला मात्र पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले या धुमश्चक्रीत ५ पाक घुसखोर ठार झाल्याचे वृत्त आहे.
जम्मू-काश्मीरमधील जिल्ह्यातील सेक्टरमध्ये कृष्णा पूंछ घाटी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आणि घुसखोरीचा प्रयत्न केला. मंगळवारी झालेल्या कृत्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या या प्रकारामुळे भारतीय लष्कर सतर्क झाले आहे.
मंगळवारी, पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांनी दोन्ही देशांमधील युद्धबंदी कराराचे उल्लंघन करून गोळीबार केला.प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या गोळीबारात लष्कराने ५ घुसखोरांना ठार मारले. गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे लष्कराने सांगितले. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न केला असता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यानंतर पाकिस्तानी लष्कराने गोळीबार सुरु केला.
यावेळी झालेल्या चकमकीत भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती लष्कराने दिली. मंगळवारी दिवसभर अधूनमधून गोळीबार सुरू होता, असेही भारतीय लष्कराने सांगितले. आमच्या सैन्याने नियंत्रित आणि संतुलित पद्धतीने प्रत्युत्तर दिले. येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले.......
0 टिप्पण्या