🌟देशातल्या सर्व राज्यांतील पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तत्काळ हुसकावून लावा....!


🌟केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश🌟

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम येथे पाकपुरस्कृत राक्षसी प्रवृत्तीच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करुन २८ निरपराध पर्यटकांची अमानुषपणे हत्या केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी तातडीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने काल शुक्रवार दि.२५ एप्रिल २०२५ रोजी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून राज्यांतील पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तत्काळ हुसकावून लावा असा सूचनावजा आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले ही यादी लवकरात लवकर केंद्राला पाठवावी म्हणजे त्यांचे व्हिसा तात्काळ रद्द करता येतील आणि त्यांना भारताबाहेर पाठवता येईल, असेही केंद्राने म्हटले.

💫केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये :-

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. सध्या पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जवानांकडून दहशतवादविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली व पाकिस्तानी नागरिकांना शोधून तत्काळ परत पाठवा, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेल्या सर्व व्हिसा सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय २४ एप्रिल रोजी घेतला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे...

💫महाराष्ट्र राज्यातील पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत महाराष्ट्र सोडावा अन्यथा कायदेशीर कारवाई - मुख्यमंत्री फडणवीस

पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द झाला असून महाराष्ट्रातील पाक नागरिकांनी पुढील ४८ तासांत देश सोडावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या