🌟छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा ४२ पार ; दुपारी १२ ते ४ ट्रॅफिक सिग्नल बंद.....!


🔴तर कामासाठी मुकुंदनगर रेल्वेगेट पाच दिवस बंद🔴

✍️ मोहन चौकेकर

🌞 *उन्हाचा कहर सुरूच!* *छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान ४२ अंशांवर पोहोचले असून, होरपळ वाढली आहे. अशातच दुपारच्या वेळेस सिग्नलवर थांबणं म्हणजे जणू गरम तव्यावर उभं राहण्यासारखे आहे त्यामुळे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे.

🚦 *ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा मोठा निर्णय:*  

*रखरखत्या उन्हामुळे वाहतूक पोलिसांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून संध्याकाळी ४ नंतर ते रात्री ९.३० पर्यंत सिग्नल नियमित सुरू राहतील.

*तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी आळीपाळीने चौकात तैनात राहणार आहेत.  

 *पोलिसांचे आवाहन – नागरिकांनी संयम बाळगावा, नियमांचे पालन करावे.

*मुकुंदनगर रेल्वेगेट पाच दिवस बंद*  

*चिकलठाणा-करमाडदरम्यान रेल्वेमार्ग दुरुस्ती होणार असून, रेल्वेगेट क्रमांक-५६, मुकुंदनगर २३ ते २७ एप्रिल दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहील.

 *या काळात प्रवाश्यांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा :*  

 🛑 *शिवाजीनगर भुयारी मार्ग*  

🛑 *चिकलठाणा भुयारी मार्ग*  

🚗 *वाहतुकीचा प्रवास नियोजनबद्ध करा – उशीर टाळा!*

*प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:*  

🛑 *घराबाहेर निघण्यापूर्वी पाणी प्या*  

🛑 *शक्य असल्यास दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा*  

🛑 *लहान मुलांना उन्हापासून वाचवा*  

🛑 *छत्री, टोपी, सनग्लासेसचा वापर करा* 

🛑 *भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक, आणि फळांचा रस घ्या* 

*सावध राहा - सुरक्षित रहा* 

*उन्हाळ्याचा तडाखा टाळा – घराबाहेर पडताना पाणी आणि टोपी/छत्री सोबत ठेवा

 ✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या