🌟परळी शहरातील सरस्वती नदी बरोबरच घनशी नदीवर ही पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज - बालासाहेब जगतकर


🌟परळी शहरातील सरस्वती नदीवर आजूबाजूला शहरातील नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पुराचा धोका🌟

परळी (दि.२३ एप्रिल २०२५) - परळी शहरातील सरस्वती नदी बरोबरच घनशी नदीवर ही पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील सरस्वती नदीवर आजूबाजूला शहरातील नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पुराचा धोका व अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे तर परळी शहराच्या लगतच असलेल्या घनशी नदीवर ्रस्थापिताच्या अनेक गुत्तेदारांनी व पुढार्‍यांनी शासनाच्या विविध योजना राबवून व राबविद असल्याकारणाने नैसर्गिक नदीचे विद्रूपीकरण तर झालेच आहे परंतु अनेक ठिकाणी सदरील नदी अडवून डॅम किंवा हौद करणे ते पाणी विटभत्यासाठी वापरणे तसेच सदरील नदीची अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळे विद्रोपेकरान झाले आहे.

त्यासाठी योगायोगाने परळीच्याच पर्यावरण मंत्री असल्याने व सरस्वती नदीवर लक्ष घातल्याने त्याचाच एक भाग म्हणून परळी शहरालगत असलेल्या घनशी नदीवर ही लक्ष घालून केलेल्या अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण काढून नैसर्गिक रुप येईल याची दक्षता घेऊन पर्यावरण मंत्र्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या