🌟राज्य परिवहन महामंडळाकडून कॉंग्रेसने पुर्णा बसस्थानकाच्या समस्यांसंदर्भातील केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील पुर्णा बसस्थानकावरील समस्यांसंदर्भात परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (एमएसआरटीसी) लेखी स्वरूपात ईमेलद्वारे निवेदन दिले होते या निवेदनावर एमएसआरटीसी आणि वाहतूक विभाग मंत्रालय मुंबई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागांकडे ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.
परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (एमएसआरटीसी) दिलेल्या निवेदनात बसस्थानकाच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते प्रवाशांना बसस्थानकात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही,तसेच स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीचा मोठा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले होते निवेदनात प्रवासी हितासाठी पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या :-
🔴 मुख्य मागण्या
1. पूर्णा शहरातील बस स्थानकाचे तातडीने आधुनिकीकरण करावे.
2. प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करावी.
3. स्थानकातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून त्यांची नियमित स्वच्छता केली जावी.
4. प्रवाशांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि पुरेश्या बाकांची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
5. रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी.
6. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासाची वेळ व माहिती दर्शविणारे फलक लावण्यात यावेत.
7. बस स्थानक परिसर नियमितपणे स्वच्छ केला जावा.
8. पालम, गंगाखेड, नांदेड, परभणी आणि उदगीर या मार्गावर नवीन बससेवा सुरू करावी.
9. महामंडळाची मोठ्या प्रमाणात जमीन पूर्णा शहरात उपलब्ध आहे.
10. पूर्णा तालुक्यात एकूण 96 गावे असून, परभणी आगाराची एकही बस पूर्णा शहरातून थेट कोणत्याही शहराशी जोडलेली नाही.
11. परिवहन महामंडळाच्या बससेवा उपलब्ध नसल्यामुळे खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
या निवेदनाचीमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दखल घेतली असून (एमएसआरटीसी) निवेदनावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली असून या संदर्भात बोलताना परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे म्हणाले की ही केवळ सुरुवात आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने या समस्यांचा पाठपुरावा प्रत्यक्षात सुरूच राहणार आहे जोपर्यंत योग्य तो निर्णय व अंमलबजावणी होत नाही जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही निखिल धामणगावे म्हणाले....
0 टिप्पण्या