🌟मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५% करण्याचा घेतला निर्णय🌟
मुंबई :- केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५% करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गेल्या मार्च महिन्यात घेण्यात आला असून या अंतर्गत लागू करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ जानेवारी २०२५ पासून लागू झाली आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळाली आहे. दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी २०२५ पासून ५५% झाल्यानंतर केंद्रातील सरकारच्या धर्तीवर अनेक राज्य सरकारांनी देखील त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, ओडिशा, गुजरात, हरियाणा, राजस्थान सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
0 टिप्पण्या