🌟राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रीगरमधून नुकसान भरपाई मंजूर.....!

 


🌟पीकविम्याचे १४०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार🌟

मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रीगरमधून नुकसान भरपाई मंजूर केली असून स्थानिक नैसर्गिक आपत्ती,हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे.

यात धुळे, नंदूरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या