🌟आग लागली की लावण्यात आली ? याबद्दल आता आरोपांच्या झडूलागल्या फैरी🌟
मुंबई :- मुंबई येथील ईडीच्या कार्यालयाला आज सोमवार दि.२८ एप्रिल रोजी मध्यरात्री ०२.३० वाजेच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली राज्यातील राजकारण्यांच्या विशेषतः विरोधकांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या या आगीत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ,मेहूल चोक्सी,निरव मोदी यांच्या सारख्या महत्वाच्या व्यक्तींवर सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या फाईली व महत्वपूर्ण पुरावे या आगीत नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सदरील भिषण आग लागली की लावण्यात आली याबद्दल आता आरोपांच्या जोरदार फैरी झडूलागल्या आहेत.
ईडीचे नाव काढले की, भल्याभल्या राजकारणी विशेष करुन विरोधकांच्या छातीत धडकी भरते. गेल्या चार-पाच वर्षात ईडीच्या चौकशांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. ईडीच्या चौकशी फेऱ्यात अडकल्यानंतर लवकर सुटका होत नाही. राज्यातील अनेक विद्यमान व माजी मंत्री आमदार ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने त्यांना आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागले होते. याच दरम्यान सोमवारी पहाटे मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला आग लागली. सुमारे नऊ-दहा तासानंतर अग्नीशमन दलाला आग अटोक्यात आणण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत मोठं नुकसान झालंय. मात्र या आगीत महत्त्वाच्या फाईल्स जळाल्याची शक्यता आहे. मेहूल चोक्सी, नीरव मोदी, छगन भुजबळ प्रकरणासह महत्त्वाच्या फाईलचा समावेश असल्याची चर्चा आहे. या आगीमुळे ईडीच्या तपासात अडखळा येवू शकतात. मात्र ईडीच्या कार्यालयाकडून याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती किंवा तक्रार पोलिसात दाखल केली नसल्याचे देखील माहिती समोर आली आहे. आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि १०० कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. सदर प्रकरणात विशेष चौकशी सुरू असून, या आगीत नेमक्या कोणत्या फाईल जळाल्या याची माहिती अद्याप समोर येवू शकली नाही. मुंबईच्या ईडी कार्यालयात मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावरील पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरण (चौदा हजार कोटी रुपये) आणि छगन भुजबळ यांच्यावरील महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच मनी लाँडरिंग प्रकरणांच्या फायली होत्या.....
0 टिप्पण्या