🌟उपजिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या एका कॉलनंतर तासाभरातच जाधव कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनातर्फे आर्थिक मदत🌟
सततची नापिकी व थकलेल्या कर्जामुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येची बातमी कळल्या नंतर त्यांच्या पत्नी ज्योती जाधव यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या. याचा अर्थ व्यवस्थेने दोन नाही तर तीन जीवांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले हे राज्य व केंद्र शासनाचे पा पासून हे व्यवस्थेने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेले बळी आहेत असे यावेळी बच्चू कडू म्हणाले.
एवढी मोठी घटना घडल्यानंतर गावांमध्ये तलाठी व तहसीलदार पंचनामा करण्यासाठी किंवा मदतीसाठी आले नाही अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी तहसीलदार संदीप राजापुरे यांना फोन लावला परंतु तहसीलदारांनी फोन रिसीव न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांना फोन लावून जाधव कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्याबाबत व शासकीय योजना मंजूर करून त्यांना त्याचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर तसीलदार संदीप राजापुरे यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलते मुळे त्यांच्यावरती कारवाई करावी असेही बच्चू कडू यांनी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांना सांगितले.
बच्चू कडू यांनी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांना केलेल्या कॉल नंतर एका तासातच तहसीलदार संदीप राजापुरे हे आर्थिक मदत घेऊन माळसोन्ना येथील जाधव कुटुंबीयांच्या घरी पोहोचले. त्यांना आर्थिक मदत देऊन पुढील सर्व मदत करण्याचे आश्वासन जाधव कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मा. बच्चू कडू यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, परभणी तालुकाप्रमुख उद्धव गरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माळसोन्ना गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या