🌟संविधानामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी - कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि🌟
या वेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विद्यापीठ उप अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रेम कांबळे आदींची उपस्थिती होती शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संघर्ष करण्याचे आवाहन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विद्या, प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, या पंचतत्त्वांचा अवलंब करून महामानवांचे विचार अंगीकारावेत. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू समजून सांगत “ते होते म्हणूनच आज आपण आहोत” (we are because he was) असे नमूद केले कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वकोश असल्याचे सांगत त्यांचे कार्य सर्वव्यापी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाला. शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांनी सर्वांना दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे कर्तव्य निभावावे तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. याबरोबरच तसेच प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा व वेळेचा काही भाग समाजहितासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले डॉ. गजेंद्र लोंढे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या भूमिकांचे कौतुक केले. या सादरीकरणाने आणि लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली.
प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.रामप्रसाद खंदारे व अंतिम वर्षातील विद्यार्थी अमोल घुफसे यांनी तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले या कार्यक्रमात जयंती उत्सव समितीद्वारे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता विद्यापीठातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाला. यासाठी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी समन्वय साधून उत्कृष्ट कार्य केले........
0 टिप्पण्या