🌟भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात 'मधून पाकिस्तानला इशारा🌟
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना आपण न्याय देणार आहोत सध्या भारतीयांचे रक्त खवळले आहे असे मन की बात' कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी उचललेली कायदेशीर पावले याबद्दल त्यांनी यावेळी भाष्य केले यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की या कटाचे षडयंत्र रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दहशतवादाचा पुरस्कारता पाकिस्तानला दिला.
मन की बात या कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की "आज तुमच्याशी संवाद साधताना, माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले. या दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयांचे रक्त खवळले आहे याची मला कल्पना आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना खात्री देतो की, त्यांना नक्कीच न्याय मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांना आम्ही मोठा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देशात जो आक्रोश आहे, तोच आक्रोश जगभरात आहे. या हल्ल्यानंतर जगभरातील नेत्यांनी माझ्याशी संवाद साधला. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. संपूर्ण जग आज दहशतवादविरोधी लढाईत भारताबरोबर आहे," असेही मोदी म्हणाले देशाची एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे," असे पंतप्रधानांनी सांगितले.
"काश्मीरमध्ये शांतता परतत होती. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य येत होते. बांधकामांना अभूतपूर्व गती मिळाली होती. लोकशाही मजबूत होत होती. पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. लोकांचे उत्पन्न वाढत होते. तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. पण हेच देशाच्या शत्रूना आणि जम्मू-काश्मीरच्या शत्रूना आवडले नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे," असेही ते म्हणाले.
"पहलगाम हल्ला हा दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांच्या निराशेचे प्रतीक आहे आता कुठे काश्मीर पूर्वपदावर येत होते, परंतु दहशतवाद्यांना ते रुचले नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' हे भारताच्या परंपरा आणि मूल्यांना सामावून घेते. संकटात जगाचा मित्र म्हणून मानवतावादाप्रति बांधिलकीचे भारत हा प्रतीक आहे. मी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याची निंदा केली. त्यांनी मला फोनवर, पत्र पाठवत आणि संदेश देत या लढाईत भारतासोबत असल्याचे सांगितले," असेही मोदी म्हणाले.....
0 टिप्पण्या