🌟धर्मांध अतिरेक्यांना धडा शिकवणे हे आपले धर्मकार्य - सरसंघचालक मोहन भागवत


🌟अहिंसा आपला स्वभाव आहे आपली मूल्ये : पण काही लोक बदलत नाहीत जगाला त्रास देत राहतात असेही ते म्हणाले🌟 

नवी दिल्ली : राष्ट्रासह समाजावर होणाऱ्या संकटांचा प्रखरतेने सामना करणेही गरजेचे असल्याचे सांगतानाच धर्मांध अतिरेक्यांना धडा शिकवणे हे सुद्धा आपले धर्मकार्यच आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी ठणकावून सांगताना केले एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भागवत म्हणाले, 'अहिंसा आपला स्वभाव आहे आपली मूल्ये आहेत पण काही लोक काही केल्या बदलत नाहीत कितीही प्रयत्न केले तरी ते जगाला त्रास देत राहतात अशा वेळी काय करायचं ?

रामायणातील एका उदाहरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, 'अहिंसा हा आपला धर्म आहे. परंतु जर कोणी वाईट मार्गावर चालत असेल, तर त्याला थांबवणे हेसुद्धा आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांना कधीही त्रास देत नाही. पण जर कोणी वाईट मार्गावर गेला, तर दुसरा कोणता पर्याय उरतो ? राजा म्हणून लोकांचे रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्य आहे भागवत पुढे म्हणाले, 'जर सत्य ओळखायचे असेल, तर कोणत्याही एकट्या व्यक्तीमध्ये पूर्ण सत्य समजून घेण्याची शक्ती नसते. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून सत्य सांगतो. सर्वांचे विचार ऐकून जर एकमत झाले, तर ते प्रस्ताव अधिक खरी ठरते आणि त्यावर निर्णय होतो.'

यापूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात, पहलगाम हल्ल्यानंतर भागवत यांनी म्हटले होते की, सध्याची लढाई पंथ व धर्म यांच्यात नाही, तर 'धर्म' आणि 'अधर्म' यांच्यात आहे. भागवत म्हणाले, 6 लोक कधीही कोणाच्या धर्मावरून चौकशी करून हत्या करत नाहीत. पण कट्टरपंथीयांनी लोकांचे धर्म विचारून त्यांना ठार मारले. हिंदू कधीही असे करत नाहीत. म्हणूनच देशाला मजबूत असले पाहिजे.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या