🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मंत्रिमंडळाचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंनी मानले आभार🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील मत्स्यव्यवसायाला कालपासून कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय काल मंगळवार दि.२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मानले. ते मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदे यांच्यासह कोळीबांधव उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, देशाला परकीय चलन तसेच प्रथिनयुक्त अन्न पुरविण्यात मत्स्य व्यवसायाचे मोठे योगदान आहे. राज्य कृषीप्रमाणे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात चांगले उत्पादन व उत्पन्न घेण्यास सक्षम आहे. आजच्या निर्णयामुळे राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना याचा फायदा होणार आहे.
0 टिप्पण्या