🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालयाच्या बॅच २००२ ते २००८ च्या विद्यार्थ्यांनी सादर केला 'आठवणींचा परिपाठ'.....!

(श्री सोमेश्वर विद्यालयाच्या बॅच २००२ ते  २००८ च्या विद्यार्थ्यांनी सादर केला 'आठवणींचा परिपाठ' माजी विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण उपस्थित सर्व छायाचित्रकार मंगेश पारवे) 


🌟यावेळी शाळेचे ब्रीद वाक्य "विद्याधनम् सर्वधनम प्रधानम्" असे प्रतिपादन प्रा.महेश पारवे यांनी केले🌟

पुर्णा/गौर :- समाजातील निवडक अनुभवी माणसं एकत्र बोलावून सुरू केलेलं काम मुला-मुलींचे उज्वल भविष्य घडवू शकते याचे जिवंत उदाहरण श्री सोमेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे. 1993 ते 2025 पर्यंत अनेक मुलं चांगल्या पदावर आपले जीवन जीवन जगत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. शाळेचे ब्रीद वाक्य "विद्याधनम् सर्वधनम प्रधानम्" असे प्रतिपादन प्रा.महेश पारवे यांनी केले.                                                            

गौर येथील नांदेड पूर्णा निर्मल हाइवेवरील श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार बोगळे, प्रमुख अतिथी अंबादास काळे ,गंगाधर आंबेगावे, सतीश गोरे ,श्रीमती शिवणकर रंजना, अच्युत जोगदंड ,नवनाथ बोबडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

        पूर्ण दिवस चाललेल्या कार्यक्रमात विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या सर्व नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण ,विद्यार्थी असताना चे आईचे पत्र हरवले, कोंबडा झुंज,अंताक्षरी यासह इतर सर्व खेळ खेळून आनंद घेतला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. अत्यंत भावनिक होऊन माणूस कितीही दूर गेला तरीही जवळ येण्यासाठी मुद्दामच प्रयत्न करावे लागतात या विषयावर चिंतन करण्यासारखे आहे.स्वाती मोरे(चंदेल),संदीप जोगदंड,अमोल पारवे,केशव कदम, विष्णू जोगदंड,दिगंबर चव्हाण,लता बनसोडे ( खराटे) पहेलवान उत्तम डुब्बे  यांनी व सर्व वर्गमित्रांनी सामुहिक पणाने व्यवस्थापनाचे कार्य केले

कार्यक्रमात अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने "आठवणींचा परिपाठ" या मथळ्याखाली सादर केले.कवी कुमार विश्वास यांच्या "रुप को भाव अनुकृती मिले" ने झालेल्या सुरवातिची  गझलकार दुष्यंत कुमार यांच्या "ये सुरत बदलनी चाहिए."..या गझलने सांगता झाली.

प्रा.सोनी भगत (बोरामने) व मनिषा नागठाणे (बेले) यांच्या "सर्वात्मका शिवसुंदरा" या प्रार्थनेने शालेय परिपाठाची सर्वांना आठवण झाली शाळेत कधी व्यासपीठावर न येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवडीने शेती करणाऱ्या केशव कदम, गृहिणी कविता नागठाणे(हलगे )सुदेशना हुरणे (मिटकरी)यांनी केलेले संवेदनशील मनोगत कार्यक्रमाचा उद्देश सफल झाल्याचे द्योतक होते.

प्रा.सोनी भगत यांची...."मला परत श्री सोमेश्वर विद्यालयात शिकायचंय.."हि कविता सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना पूर्वाश्रमीच्या दिवसांत घेऊन गेल्याने वातावरण अत्यंत काव्यमय व भावनिक झाले होते. प्रास्ताविक विनायक मोगले यांनी केले सूत्रसंचालन सोनी भगत यांनी केले आभारप्रदर्शन बॅच चे  वर्ग प्रतिनिधी  गणेश जोगदंड यांनी केले.


                               सोनी भगत (बोरामने) जिल्हा परिषद शिक्षिका शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते किती उदात्त आहे आणि त्यांच्या एकत्रीकरणाची चांगल्या समाजाच्या जडण घडणीसाठी किती गरज आहे हे यात दिसून आले. सर्व शिक्षकांच्या प्रतिक्रिया शिक्षकी पेशाची कृतार्थ भावना व्यक्त करणाऱ्या व प्रेरणादायी होत्या. आठवणी,आनंद आणि अभिमान सर्व काही मिळाले.


संदीप जोगदंड शेतकरी गौर.माजी विद्यार्थी परत एकत्र आल्यामुळे आम्हाला बऱ्याच दिवसांनी शाळेचे दिवस परत जगता आले. सगळ्या मित्रांनी सहकार्य केल्याने अंत्यंत कमी वेळात नियोजन खुप छान झाले. शाळेने देखील खुप सहकार्य केले. वेगवेगळ्या क्षेत्रातील  मित्र भविष्यात एकमेकांना सहकार्य करून राहतील "एकमेका साह्य करू; अवघे धरू सुपंथ" या भावनेची अनुभुती आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या