🌟पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी आसिफचे घर उडवले बॉम्बने...!


🌟पाकिस्तान ३० वर्षांपासून पोसतोय दहशतवाद :  पाकिस्तान निर्लज्जपणे कबुली अमेरिका इंग्लंडवर फोडले खापर🌟

श्रीनगर : पाकपुरस्कृत दहशतवादी नेटवर्कविरोधात भारतीय सैन्य दलाने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली असून त्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला राक्षसी प्रवृत्तीचा धर्मांध दहशतवादी आसिफ शेख याचे घर बॉम्बने उडवण्यात आले आहे तर दुसऱ्या दहशतवाद्याचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले आहे राक्षसी प्रवृत्तीचा आसिफ 'लष्कर-ए-तोयबा' या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा दहशतवादी होता सुरक्षा जवानांनी त्रालमध्ये ही कारवाई केली.

दरम्यान,बंदीपोरा भागात नाका तपासणीदरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफिक खांडे आणि मुख्तार अहमद डार यांना पकडले त्यांच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. जेव्हा पोलिसांनी भारतीय सैन्यासह नाकाबंदी केली तेव्हा त्यांनी रईस अहमद डार आणि मोहम्मद शफी डार यांना अटक केली. त्यांच्याकडून हँड ग्रेनेड,७.६२ मिमी मॅगझिन आणि ७.६२ मिमीचे ३० राऊंड जप्त करण्यात आले.

💫पाकिस्तान ३० वर्षांपासून पोसतोय दहशतवाद :  पाकिस्तान निर्लज्जपणे कबुली अमेरिका इंग्लंडवर फोडले खापर :-

इस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली आहे. गेल्या तीस वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे, अशी कबुली त्यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

गेली ३० वर्षे दहशतवाद पोसण्याचे काम आम्ही अमेरिका, इंग्लंडच्या सांगण्यावरून करत असल्याचे खापर त्यांनी फोडले. दहशतवाद पोसणे ही मोठी चूक होती, त्याचे परिणाम आज आम्हालाही भोगावे लागत आहेत, असे ते म्हणाले.पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना पाठिंबा देतो, असा खुलेआम आरोप भारत जागतिक व्यासपीठावरून सातत्याने करत असतो. आता त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, अत्यंत चलाखीने याचे खापर त्यांनी अमेरिका, ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांवर फोडले आहे. अमेरिका, पाश्चिमात्य देशांसाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना समर्थन दिले. या कारनाम्यासाठी आम्हाला दोषी ठरवले जाऊ नये. कारण पाकिस्तान दुसऱ्या देशांच्या निर्देशानुसार काम करत होता.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने घेतली आहे. ही दहशतवादी संघटना हाफीज सईदच्या 'लष्कर-ए-तोयबा'शी संबंधित आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर राजनैतिक अधिकाऱ्यांची कपात केली आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. या नागरिकांना आपल्या देशात जाण्यास सांगितले आहे. तसेच सिंधु नदी करारही स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तान संतापला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या