🌟नांदेड जिल्हा पोलिस दला तर्फे क्रांतिकारक पाऊल : पोलिस दलाने ओळखले वाढत्या गुन्हेगारीचे मुळ कारण बेरोजगारी....!


🌟बेरोजगारी हटवण्याच्या दिशेने उपाययोजना : येत्या ०३ मे पासून पोलिस मुख्यालयात बेरोजगारी मेळावा सुरू करण्याचा मानस🌟 

पोलिसाचें कार्य म्हणजे केवळ गुन्हेगारा विरूद्ध एफ आय आर दाखल करने व त्यांच्या केलेल्या गुन्ह्या नुसार सजा मिळवून देणे इथवर सीमीत नसुन तर मुळात गुन्हे घडणाराच नाही या बाबतीत काळजी घेणे आवश्यक असल्याचे सध्या नांदेडच्या पोलिस अधीक्षक श्री अबिनाश कुमार व त्यांच्या टिम च्या कार्यशैली तून दिसत आहे. जेव्हा पासून नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक पदाच्या श्री अबिनाश कुमार साहेबांनी पदभार स्वीकारला तेव्हां पासून सतत गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांची धरपकड व वेगवेगळ्या अवैध धंद्याची विल्हेवाट लावण्यासाठी चांगले कार्य नियमितपणे राबवत आहेत. परंतु आता पोलीस दला तर्फे आज पर्यंत जे कधी घडले नाही त्या बाबतीत बारकाईने लक्ष घालण्यासाठी सरसावले असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारी मध्ये प्रर्वत होण्याच्या कारणा मध्ये बेरोजगारी हे ही एक महत्त्वाचे कारण होऊ शकते अशाच विचाराने म्हणावे लागेल नांदेड जिल्हा पोलिस दला तर्फे विचार करुन "भव्य रोजगार मेळावा" 3 में पासून पोलिस मुख्यालयात सुरू करण्याचा मानस केला आहे हा एक गुन्हेगारी वृत्तीच निर्माण होणार नाही या मध्ये क्रांतिकारक पाऊल उचलले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज पर्यंत पोलिस म्हटले की साधारण नागरिकांच्या मनात भिती व चुकीच्या धारणा प्रचलित आहेत. जसे की चोऱ्यांचे प्रमाण व गुन्हेगारी वाढली तर साधारण नागरिक दब्ब्या आवाजाने "इन सब में पोलिस मिली हुयी रहती.... पोलिस को सब कुछ पता होता है" असे म्हणताना ऐकायला मिळते. परंतु या रोजगार मेळाव्या मुळे सर्व सामान्य माणसाच्या मनात पोलिसा बदल आदराची भावना व पोलिसा बदल सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण होण्यात खूप  प्रेरणादायी मदत मिळेल. मा श्री अबिनाश कुमार जी व त्यांच्या टिम आणि संपूर्ण पोलिस दलाचे मना पासून आभार व आपल्या रोजगार मेळाव्यास माझ्या तर्फे शुभेच्छा. विशेष विनंती आपल्या अशा चांगल्या रोजगार उपक्रमात माझ्या कडून योग्य ती सेवा पुढील एक महीन्या नंतर मी देण्यासाठी प्रयत्नशील आहे.....  

राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू

 इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर नांदेड 7700063999*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या