🌟छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव रत्नपूर करणार - पालकमंत्री संजय शिरसाट

 


🌟असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे🌟

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव मुगल काळात रत्नपूर होते परंतु औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद असे केले तर देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचे देखील नामांतर होणार आहे असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

शिरसाट म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले. नगरचे नाव बदलले गेले. हे सगळे 'बाद' 'बाद' आहे ना त्यांची नावे बदलण्याची प्रोसेस आम्ही करत आहोत. औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले. नागपूरमध्ये दंगल देखील झाली. यानंतर आता औरंगजेबांची कबर असणाऱ्या तालुक्याचे नाव बदलणार असे त्यांनी म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या