🌟बेछूट गोळीबारात २७ निरपराध पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू ; 'टीआरएफ'ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली🌟
बायसरन या केवळ पायवाट असलेल्या ठिकाणी पर्यटक मेले होते, तेव्हा नजीकच्या खोच्यातून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यामध्ये २७ पर्यटक ठार झाले असून अन्य काही जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पहलगाममधील पर्वतावर ट्रेकिंगसाठी पर्यटक जातात. हिरव्यागार कुरणांमुळे या भागाला 'मिनी स्वित्झर्लंड' असे मानतात आणि तेथेच हा दहशतवादी हल्ला झाला आहे. लपलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
या हल्ल्यामध्ये गुजरातमधील तीन आणि कर्नाटकमधील दोन पर्यटक जखमी झाले आहेत. रीनो पांडेय, डॉक्टर परमेश्वर, बीनो भट्ट, माणिक पटेल यांची नावे जखमींच्या यादीमध्ये आहेत. एका महिला पर्यटकाने काश्मीर पोलिसांना दूरध्वनी करून या हल्ल्याची माहिती दिली घटनास्थळावरील हल्ल्याच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक जण रक्ताने माखलेले तर काही जण निपचित पडलेले दिसत असून एक महिला पयर्टक आक्रोश करीत आपल्या आप्तेष्टांचा शोध घेत असताना दिसत आहे दहशतवादी साधारणतः पर्यटकांवर हल्ला करत नाहीत, कारण याचा परिणाम स्थानिक रहिवाशांच्या व्यवसायावर होतो. त्यामुळे प्रथमच पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
💫काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारने आता जबाबदारी घ्यावी - राहुल गांधी
या भ्याड दहशतवादी हल्ल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया हँडल 'एक्स' वर लिहिले की, पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारने आता जबाबदारी घ्यावी आणि ठोस पावले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा क्रूर घटना घडणार नाहीत.
💫काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून निषेध :-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निष्पाप पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध केला असून हा मानवतेवरील कलंक असल्याचे म्हटले आहे. देशाची सुरक्षा सर्वोच्च असून केंद्र सरकारने तातडीने योग्य त्या उपाययोजना आखाव्या, असेही त्यांनी म्हटले आहे.....
💫जा मोदींना जाऊन सांग :-
कर्नाटकातील उद्योगपती मंनी आपल्या लहान मुलांम्ह पहलगामाता गेले होते, पल्लवी यांनी सांगितले की आम्ही तिथे जण मी माझे पती आणि आम मुलगा मारला गेला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी हल्ला केला तिथे माझ्या डोळ्यासमोर पतीला मारुन टाकले हिदू पर्यटकांना लक्ष बनवले तीन ते चार लोकांनी आमच्यावर हल्ला केला. मी त्यांना म्हटले, तुम्ही माझ्या नवऱ्याला आधीच मारते आहे, आम्हाला देखील मारा तर त्यातला एक दहशतवादी मी तुला मारणार नाही जा मोदीला सांग पल्लवी यांनी विनंती करून त्यांच्या पतीचा मृतदेह लवकरात लवकर शिवामला आणण्याची मागणी केली त्यानुसार तातडीने मृतदेह आणि जखमींना खाली आणण्यात आल्याची माहिती आहे.
0 टिप्पण्या