🌟मुंबई,नांदेड व नागपूरात शहिदी दिवस साजरा करण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार : स्थानिक शिख समाजाकडून विरोध एक अवलोकन🌟
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी च्यां संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील शिख समाजाच्या अकरा सदस्यीय समिती द्वारे हीन्दू धर्माच्या रक्षणार्थ आपले बलिदान देणाऱ्या श्री गुरु तेग बहादर जी चां शहीदी दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी नियोजन भवन कलेक्टर ऑफिस येथे भाजपच्या नेत्यांनी शिख समाजाच्या काही लोकांना, सरकारी अधिकाऱ्यांना,शिकलकरी समाज, बंजारा समाज व लभानी समाजाला आमंत्रित करून त्यांचें विचार जाणून पुढील रूपरेषा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
परंतु या पहील्या कार्यक्रमा पासुनच नांदेडच्या शिख समाजाच्या वतीने या शासकीय कार्यक्रमास विरोध सुरू झाला आहे.......तसे पाहिले तर मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी नी मागिल काँग्रेस सरकारने गुरतागद्दी विकासाच्या वेळी मनमानी पद्धतीने गुरूद्वारा बोर्ड वर 61 करोडचा लादलेल्या कर्जातून संचखड गुरूद्वाऱ्याला मुक्त केले होते. तसेच आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या नंतर वेळोवेळी मुंबईत शिख समाजाच्या धार्मिक समारंभात जातीने उपस्थित राहून श्री गुरु ग्रंथ साहीब जी पुढे नतमस्तक होऊन भक्तीभावाने शिख समाजाच्या व शिख समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शिकलकरी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक 11 सदस्यीय समिती स्थापन करून त्यांच्या कडून समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढतो असे स्पष्ट शब्दात आपली भावना व्यक्त केली होती........ तसेच आपण भाजपाच्या आघाडी सरकारने चांगल्या केलेल्या काही बाबींकडे डोळेझाक करून चालणार नाही. जसे की केंद्र सरकारने वीर बालदिवस संपूर्ण दुनियेत शासकीय स्तरावर साजरा करण्याचे एक चांगले पाऊल उचलले आहे. तसेच भाजप शासनाच्या काळात विविध विकासाच्या गोष्टींना नाकारता येत नाही जसे की रस्ते असो किंवा रेल्वे मध्ये अनेक सुधारणा अथवा महीलानां लाडक्या बहीणी योजनेत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली व शासकीय कार्यालयात सुरळीत काम करत लाचखोरी रोखण्यासाठी प्रयत्न करणे अशाच प्रकारे अन्य कामें....... परंतु एवढ्या सर्व सकारात्मक गोष्टी समोर असुन सुद्धा स्थानिक शिख समाजाच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा विरोध का होत आहे हे ही जाणुन घेणे गरजेचे आहे....काय फक्त व फक्त विरोध करायचा म्हणून करत आहेत की त्याच्या मागे शिख समाजाच्या अन्य काही भावना जुळलेल्या आहेत हे ही जाणुन घेणे गरजेचे आहे....या बाबतीत माझ्या व्यक्तिगत विचारातून गेल्या काही दशकांपासून शिख समाजाचे लोक महाराष्ट्र सरकार चा धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला तर या बाबतीत संदेहाने पाहत आहेत त्याचे काही कारणे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न........1) गेल्या दोन तीन दशकांपासून महाराष्ट्र सरकार तर्फे गुरूद्वऱ्यात फार मोठ्या प्रमाणात दखल अंदाजी करत कधी प्रशासक तर कधी प्रशासकीय समिती गुरूद्वारा बोर्ड वर थोपवून संविधान ने लोकशाही मार्गाने बोर्ड सदस्य निवडून देण्याच्या अधिकारा पासून शिख समाजाला वंचित ठेवले आहे........2) गुरूतागद्दी सोहळ्याचे निमित्त साधून तत्कालीन सरकारने गुरूद्वारा बोर्ड वर डी जी पी ची प्रशासक म्हणून नेमणूक केली व दडपशाही करत विकासाच्या नावाखाली राज्य सरकार व केंद्र शासनाच्या कडून भरपूर नीधी आणुन ही गुरूद्वारा व गुरूद्वारा लगतच्या परिसरातील विकास कामे करून न केल्या सारखी आहेत.....3) गुरतागद्दी विकासाच्या नावाखाली विस्थापितांना त्यांच्या जागेचा योग्य तसा मोबदला न देता फक्त 230 रु फुट प्रमाणे जमीनी बळकावून घेतले...... तसेच विस्थापित लोकांचें पुर्नवसन करण्यासाठी अबचलनगर कॉलनी स्थापित केली परंतु आज पर्यंत तेथील लोकांना वायद्याच्या हीशोबाने मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आले नाही......4) संचखड गुरूद्वारा बोर्ड च्या अनेक जमिनीवर आरक्षण घोषित करून अल्पसंख्याक शिख समाजाच्या धार्मिक स्थळांवरिल विकासाला रोक लावल्याचे दिसून येते...5) त्यातच भर म्हणजे 2014 ला मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी नी गुरूद्वारा बोर्ड कायद्याच्या कलम 11 मध्ये सुधारणा करून थेट सरकारी चेअरमन पाठविण्याचा पांयडाच पाडलेला आहे याचा विरोध शिख समाजाच्या व्यतिरिक्त नांदेडच्या सर्व जनतेने प्रचंड प्रमाणात विरोध केला व ह्या कामी सर्व वर्तमानपत्रात व टी व्ही चैनल मना पासून शिख समाजा सोबत उभे राहून पाठपुरावा केला परंतु याचा काहीच फायदा झाला नाही.... विशेष बाब म्हणजे आता पर्यंत पाठविण्यात आलेल्या चेअरमन मध्ये नांदेडच्या स्थानिक लोकांना डावलून व आमदार खासदार व स्थानिक राजकीय नेत्यांच्या मतांचा विचार न करता नेहमीच बाहेरच्या चेअरमन ला लादलेले आहे.....6) याच्या व्यतिरिक्त आज पर्यंत च्या इतिहासा वर ही नजर टाकने गरजेचे आहे. नेहमी गुरूद्वारा बोर्ड ने नांदेडच्या जनतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व विकासाच्या दृष्टीने आपल्या अनमोल जमीनी सरकारच्या सुपुर्द केले परंतु त्या जमीनी ज्या उद्देशाने दीले तसा त्याचा उपयोग न करता शासकीय कार्यालये मुख्य उद्देशाला बाजुला ठेवून त्या आपल्या व्यावसायिक उत्पन्न वाढविण्यासाठी करत आहेत... जसे नंदीग्राम मार्केट ची जागा उद्यान व पैलवानी आखाडा या साठी दिले होते परंतु आज दुकाने बांधुन महानगरपालिका लाखो रुपये कमाई करत आहे... तसेच माता गुजरी उद्यान जनतेला मोफत सुविधा दील्या जाव्यात परंतु त्या साठी नागरीकांना पैसे मोजावे लागतात...आज खेळाडू च्या विकासाच्या दृष्टीने एक ही मैदान नाही श्री गुरु गोबिंद सिंघ जी स्टेडियम वर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ खेळवू शकतो परंतु या कडे दुर्लक्ष होत आहे.... श्री गुरु गोबिंद सिंघ जी हॉस्पिटल ची जागा नागरिकांना वैद्यकीय सेवा चांगल्याप्रकारे उपलब्ध करण्यासाठी दीली होती परंतु तो उद्देश पुर्ती होत नसल्याचे चित्र दिसत आहे..अशी अनेक उदाहरणे पाहवयास मिळतील... श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार करून विमानसेवा वाढविता येते परंतु मुख्य अमृतसर हून विमानसेवा बरोबर नाही...7) विशेष बाब म्हणजे 2014 पासून संपूर्ण महाराष्ट्रात नवव्या वर्गात सर्व भाषेत शिख समाजाच्या आदरणीय संत जनरैल सिंघ जी भिंद्रनवाले व शिख समुदायाची प्रतिमा मलीन होईल असा इतिहास शिकवला जात आहे व भिंद्रनवाले जी ना दहशतवादी संबोधित केलेले मजेशीर गोष्ट ही आहे की सरकारी नोंदीत संत बाबा जनरैल सिंघ जी भिंद्रनवाले यांच्या वर संपूर्ण भारतात कुठेही साधा गुन्हा दाखल नाही मग त्यांना दहशतवादी कसे म्हणता येईल...त्यातच भर म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांनी सांसदेत संत भिंद्रनवाले व श्री गुरु ग्रंथ साहीब जी बदल अपमानास्पद भाषेचा उपयोग केला... 8) याच्या व्यतिरिक्त स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासना तर्फे वारंवार अन्याय केल्याची अनेक उदाहरणे पाहवयास मिळतील जसे शिख समाजाच्या व शिख समाजाच्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शिकलकरी समाजाच्या घरावर छापे टाकून प्रत्येक शिख व्यक्ती ला क्रिपाण धारण करण्याचा अधिकार ला नजर अंदाज करत क्रिपाण जप्त करून मोठी कामगिरी केलेल्यांचे प्रदशिर्त करतात. परंतु हे विसरून जातात की एका घरात व्यक्ती च्या हीशेबाने चार पाच तलवारी मिळणे साहाजिकच आहे... या व्यतिरिक्त का वर्षा पूर्वी होळी सणाच्या दिवशी अनेक निरपराध लोकांवर गुन्हें दाखल करत अनेक दिवस डाबुंन ठेवले...9) मागिल काही वर्षांत स्थानिक राजकीय नेत्यांचा गुरूद्वारा बोर्ड मध्ये थेट हस्तक्षेप वाढलेला दिसतो.... या अगोदर मा शंकर राव चव्हाण होते तेव्हा किंवा वर्तमान मध्ये मा अशोकराव जी चव्हाण कधीच कोण्या आपल्या माणसाला नौकरी लावने अथवा कोणाला गुरूदऱ्याची जमीन व्यक्तिगत वापरा साठी मिळवून देण्यासाठी अथवा अन्य कुठलाही फायदा मिळविण्यासाठी हस्तक्षेप करत नव्हते परंतु सध्या स्थानिक नेते मंडळी असो किंवा मंत्री फोन द्वारे अथवा पत्राद्वारे गुरूद्वारा प्रशासनात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आहेत.... परंतु या सोबतच येथे एक उल्लेख करावा लागेल मा अशोकराव जी जेव्हा काँग्रेस मध्ये असताना लोकसभा निवडणुकांच्या वेळी गुरूद्वारा बोर्ड च्या कायद्याच्या अन्यायकारक कलम 11 च्या करण्यात आलेल्या सुधारणा विरोधात वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा शिख समाजाच्या लोकांना आश्वासन दिले होते परंतु त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडला आहे असे वाटते मग शिख समाजाच्या लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा......10) आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारला नेहमीच गरज भासली की गुरूद्वारा आठवतो परंतु दुःखदायक गोष्ट ही आहे की स्थानिक स्तरावर शासकीय समित्या वर प्रतिनिधीत्व देताना नेहमीच शिख समाजाची अवहेलना करताना दिसुन येते मग नांदेड विकास आराखडा समिती असो, जिल्हा नियोजन समिती, विद्यापीठात सीनेट सदस्य किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद असो अथवा अन्य कुठलाही समित्या वर प्रतिनिधीत्व देण्यात येत नाही...शिख समाजाचे अनेक उच्च शिक्षित, विचारवंत व अनेक राजकीय पक्षाचे सक्षमपणे व इमानदारीने काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही......11) आणखी एक अतिशय शर्मेची बाब म्हणजे संपूर्ण जगभरात ऐतिहासिक महत्त्व असलेले व हीन्दु धर्माच्या रक्षणार्थ आपल्या संपूर्ण वंशाचे बलिदान करणाऱ्या श्री गुरु गोबिंद सिंघ जी च्यां अंतिम स्थळ असलेल्या नांदेडला भारताच्या पर्यटन नकाशात नाव नसने म्हणजे एक प्रकारे गुरूजीचांच अपमान करण्या सारखे आहे असे ही म्हटले तरी वावगे ठरणार नाही....माझा मता नुसार या सर्व बाबी मुळे शिख समाजाच्या लोकांच्या मनात शंका उपस्थित होऊन महाराष्ट्र सरकार चा हा श्री गुरु तेग बहादुर जी च्यां 350 शहीदी दिवस साजरा करण्यामध्ये काही राजकीय कुटनीती अवलंबून गुरूद्वारा बोर्ड वर आपल्या सरकारी 11 सदस्यीय समिती द्वारे पुर्ण पणे कब्जा करण्याचे षडयंत्र तर रचले जात नाही ना ही शंका निर्माण झाल्याने व गुरूद्वारा बोर्ड ने लोकांना मोफत सेवा देतील या उद्देशाने आपल्या किंमती जमीनी सरकारच्या सुपुर्द केले होते. परंतु त्यांच्या वर दुर्लक्ष केले जात आहे म्हणूनच विरोध केला जात आहे.. दुसरे कारण म्हणजे सर्व प्रथम शिख समाजाच्या जगभरातील सर्वाच्य संचखड गुरूद्वाऱ्या पंजप्यारें साहीबानां विश्र्वासात घेऊनच पुढचे पाऊल उचलले असते तर विरोध झाला नसता कारण हा धार्मिक कार्यक्रम आहे. तरी महाराष्ट्र शासन वरील सर्व बाबींचा विशेष करून मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जातीने लक्ष घालून ह्या सर्व गोष्टींचा योग्य तोडगा काढून अल्पसंख्याक शिख समाजावरील होणाऱ्या अन्याय दूर करतील व नांदेडच्या शिख समाजाच्या भावनेच्या आदर करून संपूर्ण शिख समाजाला विश्र्वासात घेऊन पुढील आराखडा तयार करतील हीच अपेक्षा बाळगून सरकार तर्फे साजरा होणाऱ्या शहीद दिवस कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा व मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी नी शहीदी दिवस साजरा करण्यामध्ये योगदान करत आहेत या बद्दल मना पासून आभार...... लिखाण कोणत्याही व्यक्ती अथवा राजकीय नेत्यांच्या, पार्टी च्या विरोधात नाही फक्त लोकांच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न तरी कोणाचे मन दुखावले गेले तर क्षमस्व.....
स.राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू
अराजकीय सामाजिक कार्यकर्ता व
इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर नांदेड 7700063999
0 टिप्पण्या