🌟स्थानिक स्वराज्य संस्थावरील प्रशासक राज संपणार तरी केव्हा ?🌟
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लागलेली विलंबाची साडेसाती काही केल्या संपता संपत नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत.या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी येत्या ६ मे २०२५ रोजी होणार आहे.
राज्यातील मागील जवळपास चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणात मंगळवार दि.०३ मार्च २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे यामुळे न्यायालयाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढची सुनावणी करू असे न्यायालयाने म्हटले आहे.
🌟स्थानिक स्वराज्य संस्थावरील प्रशासक राज संपणार तरी केव्हा ?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज मागील जवळपास साडेतीन चार वर्षांपासून सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थावरील प्रशासकराज शेवटी संपणार तरी केव्हा ? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये आता उपस्थित होत आहे.मुंबई,पुण्यासह अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ३ ते ४ वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निवडणुकांकडे लागले आहे. लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यात प्रभाग फेररचनेचा मुद्दा आहे. त्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली नाही. राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते या दोघांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हव्या आहेत. परंतु काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी निर्णय झाला नाही. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता नाही. कारण होळीमुळे ९ ते १६ मार्च सर्वोच्च न्यायालयास सुटी आहे. त्यानंतर न्यायालयाकडून तारीख दिली जाईल त्या तारखेवर सुनावणी होईल. त्या तारखेला सुनावणी झाली नाही तर न्यायालयाला उन्हाळी सुट्टी लागेल. यामुळे हा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.....
0 टिप्पण्या