🌟महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला होणार निवडणूक.....!

 


🌟विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार🌟

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर  विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च २०२५ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून तत्पुर्वी दि.१० मार्च २०२५ पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी २७ मार्च २०२५ रोजीच लागणार आहे राज्य विधान परिषदेतील पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या आहेत विधान परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे तीन तर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने विधान परिषदेच्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

राज्य विधान सभेच्या नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमशा पाडवी,गोपीचंद पडळकर, राजेश विटेकर,प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती आमशा पाडवी (अक्कलकुवा), गोपीचंद पडळकर (जत), राजेश विटेकर (पाथरी), प्रवीण दटके (नागपूर मध्य) आणि रमेश कराड हे लातूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

💫 विधान परिषद निवडणूक प्रक्रिया अशी पार पडणार :-

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, उमेदवारी अर्ज त्याच दिवसापासून दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ मार्च आहे. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० मार्च ही शेवटची तारीख आहे. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल व मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या