🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही🌟
मुंबई : राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन कडक कायदे करत आहे कायद्या कठोर अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रती असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शनिवार दि.०८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान दिली.
जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना महिलांच्या सशक्तीकरणासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांच्या सुरक्षेचे मुद्दे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. राज्यमंत्री पंकज भोयर यावेळी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या