🌟महाराष्ट्र राज्यातील घरगुती औद्योगिक व वाणिज्य वीजग्राहकांसाठी वीज दरात कपात करण्यास मंजुरी...!


🌟विज दरात १ एप्रिल पासून कपात : नवीन वीजदराला आयोगाची मंजुरी🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील घरगुती औद्योगिक व वाणिज्य विज ग्राहकांसाठी वीज दरात कपात करण्यास विज दर आयोगाने मंजुरी दिली आहे त्यामुळे १ एप्रिल २०२५ पासून राज्यात नवीन वीज दरात दहा ते तीस टक्के कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात विज दरावरुन मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात होत्या. याबाबत वीज दर आयोगाकडे सुनावणी सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात वीज दरात मोठ्या प्रमाणात कपात केली जाईल अशी घोषणा विधानसभेत केली होती. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कँप्रन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली. स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास १० ३० टक्के वीजदर सवलत मिळेल, मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ वाजेपर्यंतच्या वीजवापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील. म्हणजे त्यांना एका हाताने दिलेला लाभ दुसऱ्या हाताने काढून घेतला जाईल. महावितरण व अदानी कँमनीचे वीजदर एक एप्रिलपासून सरासरी १० टक्के, टाटा कँपनीचा १८ टक्के तर बेस्टचा वीजदर ९.८२ टक्के कमी होईल. पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत. मात्र कृषीग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वीजदर कमी होऊन दिलासा मिळणार आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी निवासी हॉटेल्स, गेस्ट हाऊस आदींना वाणिज्यिक ऐवजी औद्योगिक ग्राहकांच्या श्रेणीत टाकण्यात आले असून त्यांचे वीजबिल लक्षणीय कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान सूर्यघर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून ती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारलेल्या घरगुती वीज ग्राहकांनी दिवसा निर्माण केलेली अतिरिक्त वीज महावितरणला पुरवून त्यांच्या अन्य वेळच्या वीजवापरातून त्याची वजावट मिळत होती. त्यामुळे या ग्राहकांना शून्य वीजबिल येईल असा प्रचार झाला व योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या