🌟वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाचे फेटाळली🌟
मुंबई : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांना बुधवार दि.०५ फेब्रुवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने दिलासा दिला त्यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी फेटाळून लावली खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रचारात खोटी आणि दिशाभूल करणारी आश्वासने दिली या दाव्यात ठोस पुराव्यांचा अभाव असल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.
मागील २०२४ या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार ॲड.उज्ज्वल निकम यांच्याविरुद्ध १६ हजार ५१४ मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या विजयावर अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आणि उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. शर्मिला देशमुख यांच्या समोर दीर्घ सुनावणी झाली.
💫मतांच्या बदल्यात मतदारांना पैसे वाटण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांचे केला होता :-
निवडणुकीत हँडबिलावर मुद्रक,प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे. त्या निकषांची पूर्तता गायकवाड यांनी केली नाही. त्यांनी जाहिरात पत्रकांद्वारे खोटी आश्वासने दिली. मतांच्या बदल्यात मतदारांना पैसे वाटण्यात आले, असे आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते. याला वर्षा गायकवाड याचे वकील ॲड. तेजस देशमुख यांनी जोरदार आक्षेप घेतला. याचिकेत पुराव्यांचा अभाव आहे. तसेच प्रचारात दिलेल्या खोट्या आश्वासनांचे स्वरूप स्पष्ट करण्यात याचिका अपयश ठरली आहे. लाचखोरीचा दावा केला असला तरी त्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही व्हिडीओ जोडलेले नाहीत, असा युक्तिवाद ॲड.देशमुख यांनी केला
0 टिप्पण्या