🌟राज्यातील यवतमाळ जालन्यात पहिल्याच दिवशी दहावी परिक्षेचा पेपर फुटला...‌!


🌟दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा🌟

जालना : राज्यातील यवतमाळ जालन्यासह जळगाव या ठिकाणी दहावीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित् समोर आले असून शिक्षण विभागासह सरकारकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करुन देखील दहावीचा पेपर फुटल्याच्या गंभीर प्रकार उघडकीस आला आहे यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे/प्रतिदावे अगदी पहिल्याच दिवशी संपूर्णतः फोल ठरले असून या पेपरफुटीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे.

या पेपरफुटी प्रकरणी चौकशीचे करण्याचे आदेश राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत जालन्यात पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आली त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणानंतर आता याप्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार ? याकडे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. जालन्यानंतर यवतमाळमध्ये पेपर फुटला आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जालन्यातील बदनापूर येथील केंद्राबाहेरील एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या. जालना शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंटस काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत होती जालना जिल्ह्यात १०२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरू आहे.

💫राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा ?

दरम्यान, जळगावमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जळगाव शहरातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दरांकडून सर्रास कॉप्या पुरवल्या जात होत्या. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा प्रकार घडत होता.

💫पेपरफुटीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई :-

परीक्षा केंद्रावरती समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती आल्याने आम्ही परीक्षा केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्याकडे माहिती मागवली असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल विभागीय शिक्षण मंडळाच्या शिक्षा सूचीनुसार बडतर्फ करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे, मंडळ मान्यता रद्द करणे अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या