🌟राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील नियमांच्या बाहेर असणाऱ्यांचा फायदा बंद होणार - मुख्यमंत्री फडणवीस

 


🌟लाडकी बहीण योजनेत नवीन निकष नाहीत : चार चाकी वाहन असणाऱ्यांची पडताळणी🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत कोणत्याही प्रकारचे नवीन निकष नाहीत परंतु लाडकी बहिण योजनेतील निकषांमध्ये न बसताही जे लाभार्थी या योजनेचा फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होतील आणि त्याची त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाही आणि परत मागणारही नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महायुती योजनेवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमुळे पाच लाख महिला अपात्र ठरणार आहेत. यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. मात्र आता सरकारने निकषात न बसणाऱ्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाही आणि परत मागणार ही नाही असं म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. मात्र आता काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार होता. मात्र सरसकट सर्वच महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे आता सरकारने आयकर विभागाकडून मागवली असून अडीच सारापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना याचा लाभ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लाडकी बहीण योजनेवर कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळी जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळा ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावर अशी कारवाई होत आहे. मला आनंद आहे की, आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की, आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत त्यामुळे आम्ही पैसे सोडत आहोत. आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल त्याच्यावर महालेखापालांचा आक्षेप येणारच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या