🌟राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनांतर्गत आता वर्षाला १५ हजार रुपये पडणार.....!

 


🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा🌟

नागपूर (दि.२४ फेब्रुवारी २०२५) - राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागावा म्हणून राज्य शासन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत देत असलेल्या रक्कमेत वाढ केली जाईल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे वर्षाला १५ हजार रुपये पडतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १९ व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे करण्यात आले. नागपूर येथील वनामती सभागृहात राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या रक्कमेचे वितरण वाटपाचा औपचारीक सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. आज शेतकऱ्यांच्या अडचणीत हा पैसा शेतकऱ्यांना उपयोगी पडत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. परिणामी, राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून त्यात वाढ देखील केली जाईल. त्यामुळे वर्षाला १५ हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी केली. मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक काम केलेत. त्यात जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली. आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय, पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल. यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉपसाठी मदत केली जाणार आहे. किंबहुना चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ऍग्रीस्टॉकमुळे दलाल विरहित शेतीपर्यंत पोहोचण्याचा साधन होत आहे. आतापर्यंत ५४ टक्के शेतकरी यात शामिल झाले असून पुढील काळात १०० टक्के शेतकरी यात आणायचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गावातील सोसायटी डिजिटल केले जात आहे. त्यांना आणखी मजबूत केलं जातं आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही. शिवाय कृषी सोलर पंप योजनेद्वारे मागच्या वर्षी पर्यंत २ लाख कनेक्शन, तर गेल्या १ वर्षात दोन लाख कनेक्शन दिले गेलेत. त्याचा पूर्ण देखरेख इन्शुरन्स आमच्याकडे आहे. वैनगंगा, नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून ७ जिल्ह्यातील १० लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. केंद्र आणि राज्यसरकार शेतकरी समर्पित असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या