🌟महाराष्ट्र शासनाच्या २,५०० कोटी रोख्यांची विक्री....!

 


🌟रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तीनुसार करण्यात येणार🌟

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या १८ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटी रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तीनुसार करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

 अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादपर्यंत वाटप करण्यात येईल. २१ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २१ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या