🌟अखेर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण ; सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु.....!

      


🌟वाल्मिक कराड याची खंडणी प्रकरणात पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु🌟 


बिड : बिड येथील पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी व केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील कथीत संशयित असलेला वाल्मिक कराड अखेर २२ दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला आहेत त्यानंतर वाल्मिक कराड याची खंडणी प्रकरणात पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.

आज वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण येणार असल्याने सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच शरण येण्याआधी वाल्मिक कराडने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्याने म्हटले होते की, “मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे”असे तो म्हणाला.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक  करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे संशयित आरोपी म्हणून नाव होते, तर खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराड २२ दिवसानंतर सीआयडीला स्वता:हून शरण आला आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या