🌟शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटीबद्ध ; माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांचे प्रतिपादन....!



🌟माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी त्यांच्या अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी दिले अभिवचन🌟


वाशिम :
- शेतकरी आमचे दैवत असून आपल्या भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते या शेतकऱ्याचे विविध सोडवण्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी हजारो शेतकरी आणी कार्यकर्त्यांच्या उपस्थीतीत केले आहे .
               माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा येथील कृषी बाजार समिती दि. 12 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला या कार्यक्रमात ते बोलत होते. या अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात  विधानपरिषदचे आमदार बाबूसिंग महाराज, माजी राज्यमंत्री सुबोध सावजी,जि प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,माजी विजयराव जाधव,दत्तराव डहाके पदवीधर मतदारसंघाचे आमदार किरण राव सरनाईक,जि.प.सभापती सुरेश मापारी,मा.सभापती हरिष महाकाळ,साहेबराव भगत,स्वप्निल ठाकरे,अमिन चव्हाण,ता.कृषी अधिकारी सचिन कांबळे,पांडुरंग कोठाडे,अनिल पाटील,सरपंच भोयर,संजय मिसाळ,बाळु पाटील,चद्रकांत पाकधने,राम ठाकरे,नाजुक भडांगे,मुकेश मुंजे,श्रीकांत ठाकरे,आर के.राठोड,आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला जि प, प. स. सदस्य कृषि उत्पन्न बाजार समिती, जिनिंग प्रेसिंग व तसेच खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी व संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या