🌟परभणीतील समाजहित न्यूजचे संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे 'उत्कृष्ट पत्रकारिता समता पुरस्काराने सन्मानित....!


🌟त्यांना मिळालेल्या 'उत्कृष्ट पत्रकारिता समता पुरस्काराबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे🌟


परभणी (दि.२५ डिसेंबर २०२४) :- निर्भीड,निष्पक्ष,पुरोगामी विचाराचे तसेच समाजातील तळागाळातील अन्याय ग्रस्त लोकांच्या भूमिका,सामाजिक कार्यांना प्रोत्साहन, चुकीच्या ठिकाणी रोख ठोक भूमिका घेऊन कार्य करण्याच्या हेतूने संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या संकल्पनेतून सुरु केलेले समाजहित न्यूज महाराष्ट्र राज्य या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म वर चालणारे वृत्त वाहिनी, पोर्टल, डिजिटल वृत्तपत्र च्या माध्यमातून निर्भीडपणे रोखठोक भूमिका मांडून शासन - प्रशासन दरबारी रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांची भूमिका मांडून जनता व शासन प्रशासनाला जागं करण्याचे तसेच परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधान विटंबना प्रकरणी सदरील प्रकरनेचे अचूक, निर्भीड पणे जीवाची पर्वा न करता संपूर्ण घटनेचे थेट प्रक्षेपण कव्हॅरेज करून, व त्या संदर्भातील बातम्या, अफवा चे खंडन करून वेळोवेळी खरी माहिती देण्याचे काम समाजहित न्यूज च्या संपूर्ण टीम ने केलेल्या कार्याची दखल घेऊन "समाजहित न्यूज महाराष्ट्र राज्य" ला  समता साहित्य अकादमी यवतमाळ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय "*उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार 2024*" प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत 21 डिसेंबर 2024 रोजी राज्याची राजधानी मुबई येथील कोहिनुर हॉल येथे प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अशोकराव माने कोल्हापूर, हिंदी सिने अभिनेते अर्जुन यादव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे, डॉ. संदीप सिरसाठ, डॉ. नितीन एस. तायडे क्राईम ब्रांच मुंबई, आयोजक डॉ. डी. एस. तांडेकर आदींची उपस्थिती होती हा पुरस्कार समाजहित न्यूज च्या संपूर्ण संघाच्या वतीने संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे, व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ, वार्ताहर  शेख कलीम, वार्ताहर युनुस कच्ची बोगानी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर, पत्रकार शेख इसाक आदींच्या वतीने स्वीकारण्यात आला आहे. "समाजहित न्यूज" ला "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024" मिळाल्याबद्दल प्रमोद अंभोरे व त्यांच्या संपूर्ण टीम वर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, महाराष्ट्र संघटन प्रमुख भगीरथ बद्दर, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, ज्येष्ठ पत्रकार मदनबापू कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार  देवानंद वाकळे, पत्रकार शिवशंकर सोनुने, पत्रकार राजकुमार हट्टेकर, पत्रकार सुधाकर श्रीखंडे, प्राध्यापक राजकुमार मनवर , पत्रकार विजयकुमार कुलदीपके, संघपाल अढागळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे काका व तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या