🌟परभणीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर शिवसेना (उबाठा) पक्षाचे ढोल बजाव आंदोलन...!


🌟प्रत्येक गावात सोयाबीन केंद्र सुरू करण्याची मागणी : आ.डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन🌟


परभणी (दि.11 आक्टोंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सुरू करावीत व कापसाला दहा हजार रूपये हमी भाव द्यावा या व  इतर मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आ. डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शुक्रवार दि.11 आक्टोंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

              शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. त्याद्वारे, जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्या निदर्शनास आणून दिल्या. अशा स्थितीत शासन दखल घेत नसल्याने आमदार डॉ. पाटील यांनी नमूद केले.  परभणी जिल्ह्यात प्रत्येक गावात सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावेत, सोयाबीनला सात हजार रुपये तर कापसाला दहा हजार रुपये हमीभाव द्यावा, नाफेडची खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत, सीसीआयची केंद्र सुरू करावीत शेतकर्‍यांना 24 तास वीज पुरवठा करावा यासह बॉण्ड ची किंमत शंभर रुपये पूर्ववत ठेवावी, 100 टक्के पीक विमा देण्यात यावा, आनंदाचा शिधा कपात न करता संपूर्णपणे वाटप करावा, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.

              यावेळी आ. डॉ. पाटील यांनी, सरकार केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींचे आहे. त्यांना शेतकर्‍यांशी काही देणे घेणे नाही, शेतकर्‍यांना सरकारने वार्‍यावर सोडले आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात असताना आता सोयाबीनची भाव देखील पाडले जात आहेत, सरकारला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला. दरम्यान, यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, अनिल डहाळे, अरविंद देशमुख, संग्राम जामकर, रवि पतंगे,दिनेश बोबडे, ज्ञानेश्वर पवार, बंडूनाना बिडकर, अर्जुन सामाले, सुनिल पंढरकर, संदिप झाडे, सुभाष जोंधळे, विशु डहाळे, बाळराजे तळेकर, अमोल गायकवाड, रामराव डोंगरे, दत्तराव मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या