🌟राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे,पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार🌟
( संक्षिप्त)
राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे,पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव
( आदिवासी विकास विभाग)
गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा
(अन्न व नागरी पुरवठा)
आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार
(कौशल्य विकास )
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी
( महसूल विभाग)
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
( गृह विभाग )
केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला
( महिला व बाल विकास)
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे
( सहकार विभाग )
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
( विधी व न्याय विभाग )
मंडणगड येथे दिवाणी न्यायालय
( विधी व न्याय विभाग)
0 टिप्पण्या