🌟मणीपुरच्या मुख्यमंत्र्याना याबद्दल जराही संवेदना असेल तर त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशीही निवेदनात मागणी🌟
परभणी (दि.२६ जुलै २०२३) - परभणी जिल्हाधिकारी यांच्या द्वारे दि.24 जुलै रोजी माहमहिम राष्ट्रपती यांना मणिपुर येथे चालू असलेल्या हिंसाचाराच्या तथा कुकी समाजातील आदिवासी महिलांची निवस्त्र करुन धिंड काढल्याप्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन मानव मुक्ती मिशनच्या वतिने देण्यात आले.
गेले अनेक महिने झाले मणिपूर राज्यात हिंसाचार सुरु आहे. स्थानिक पोलीस यंत्रणेला न जुमानता सशस्त्र जमाव आदिवासी, कुकी समुदायावर हल्ले करत आहे. 200 पेक्षा जास्त कुकी समुदयातील महिला व पुरुषांना हत्या करुन गाडल्या गेले आहे. मणिपुर राज्यातील नुकतीच एक संतापजनक घटना देशभर पसरली आहे. ज्यात तिन कुकी समुदायातील महिलांना निवस्त्र करुन त्यांची जमावाकडून धिंड काढून अवहेलना केली गेली आहे. मणिपुरच्या मुख्यमंत्र्याना याबद्दल जराही संवेदना असेल तर त्यांनी त्वरीत राजीनामा दयावा. याबददल जनसमुदयाची माफी मागावी. कुकी आदिवासी समुदायाला गावोगाव केंद्र सरकारने संरक्षण दयावे. आदिवासी समुदायाच्या झालेल्या नासधुसी बद्दल त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.आशा विविध मागण्या घेऊन हे निवेदन दिले आहे. मणीपुर सरकारचा तिव्र शब्दात निषेध करत हे निवेदन दिले आहे. या निवेदनावर
नितीन सावंत,अमोल लांडगे,अजित कदम,वभव शेटे, रामप्रसाद अंभुरे,नवनाथ महाराज,संतोष धोतरे,चैतन्य बोबडे,जयपाल धाबे,भगवान कोकाटे, बाळू बोडखे,ज्ञानेश्वर कोकाटे,बळीराम घोगरे ओमकार मार्कड, अजित कदम, एन जी खंदारे, यांच्या स्वक्षऱ्या आहेत.....
0 टिप्पण्या