🌟सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनो सावधान : कायद्याचा सन्मान राखून उर्वरीत आयुष्य जगा...!


🌟सेवानिवृत्ती नंतर गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्यास किंवा काही चुकीचे व्यवहार केल्यास पेन्शन होणार बंद🌟

दिल्ली : शासकीय सेवेत कर्तव्य बजावल्यानंतर सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आता यापुढे कायद्याचा सन्मान राखून आपले आयुष्य जगावे लागणार आहे कारण केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारणे अत्यंत महत्वपुर्ण निर्णय घेतला असून या निर्णयानुसार सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कोणत्याही गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्यास किंवा त्या कर्मचाऱ्याने चुकीचे व्यवहार केल्याचे सिद्ध झाल्यास त्याला सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणारी पेन्शन काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी थांबविण्यात येणार असून पेन्शन कामयस्वरुपी थांबवायची की ठराविक कालावधीसाठी थांबवायची, यासंबंधीचा निर्णय गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन ठरविण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एखादा गुन्हा करताना शासकीय कर्मचाऱ्यांना प्रथमतः गंभीर विचार करावा लागणार आहे.

यासोबत केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखादा कर्मचारी गुप्तचर खात्यातून किंवा सुरक्षेशी संबंधित संस्थेतून निवृत्त झाला तर त्यांना त्याच्या कामासंबंधी कोणतेही साहित्य प्रकाशित करायचे असेल तर त्यांनी संबंधित संस्थेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षेसंबंधी कोणतीही संवेदनशील माहिती शत्रूंच्या हाती लागू नये आणि देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारची ही नवी नियमावली ६ जुलै २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. यासाठी ऑल इंडिया सर्व्हिसेस रुल्स १९५८ मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही नवी नियमावली ऑल इंडिया सर्व्हिसेस अ‍ॅमेंडमेंट रुल्स २०२३ म्हणून ओळखली जाणार आहे.

* शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार हमीपत्र :-

गुप्तचर खाते किंवा सुरक्षेशी संबंधित संस्थेत काम केलेल्या निवृत्त कर्मचा-यांना विनापरवानगी कोणतेही साहित्य प्रकाशित करणार नसल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. जर या हमीपत्राचे उल्लंघन केल्यास त्या कर्मचा-याची पेन्शन थांबवण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या